Tuesday 7 January 2014

अंबरिश मिश्र यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

7/1/2014
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यंदा टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अंबरिश मिश्र यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आणि सुरेंद्र गांगण यांच्या समितीने ही निवड केली आहे. मिश्र यांचे वार्ताहर संघाने अभिनंदन केले आहे.