मुंबई : चांगला समाज घडवायचा असेल तर प्रत्येकाने त्यासाठी झिजावे लागते. मात्र ती तयारी सध्या कोणाची नाही; परंतु तरीही ही जबाबदारी पत्रकारांवर येऊन ठेपते. समाज घडवण्यासाठी पत्रकारांचा मोठा वाटा आहे, असे मत मनसेचे उपविभागप्रमुख हेमंत कांबळे यांनी येथे व्यक्त केले. मनसे प्रभाग २५च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वृतपत्र वाचनालयाचा ५वा वर्धापन दिन व स्थानिक पत्रकार लेखक यांचा सत्कार सोहळा रविवारी कांदिवली (पूर्व) येथे आयोजित केला होता. याप्रसंगी कांबळे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यकर्ता पडत-झडतच मोठा होत असतो. त्याला समजून घ्यायला हवे, असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन केले. आमच्या विभागातील समस्या पत्रकार पोटतिडकीने मांडतात; पण त्यांनी यावरच न थांबता चांगला समाज घडवण्याची भूमिका घ्यावी, असे ते शेवटी म्हणाले.