आयबीएन न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक आणि प्रसिध्द पत्रकार राजदीप सरदेसाई व त्यांच्या पत्नी सागरिका घोष यांनी राजीनामा दिल्यानंतर आयबीएन लोकमतचे निखिल वागळे यांनी सुद्धा राजीनामा दिल्याच्या अफवांना पेव फुटले आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने नेटवर्क 18 समुहाची खरेदी चार हजार कोटींना केली आहे. या पार्श्वभूमीवर राजदीप व त्यांच्या पत्नी आणि उप मुख्य संपादक सागरिका घोष या देखील रजेवर गेल्या होत्या. राजदीप आणि सागरिका या दोघांनीही आपला राजीनाम दिला आहे. याच दरम्यान आयबीएन लोकमतचे नितीन वागळे यांनीही राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या आहेत. वागळे गेल्या चार दिवसांपासून आजचा सवाल आणि प्राईम टाईम बुलेटीनमध्ये दिसत नाहीत यामुळे अफवांना पेव फुटले आहे. काही दिवसांपुर्वी वागळे यांनी ट्युटरवर "मुंबईच्या जीवनाचा कंटाळा आला आहे" असे ट्युट केले होते यामुळे वागळेंनी आयबीएन - लोकमत सोडले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने नेटवर्क 18 समुहाची खरेदी चार हजार कोटींना केली आहे. या पार्श्वभूमीवर राजदीप व त्यांच्या पत्नी आणि उप मुख्य संपादक सागरिका घोष या देखील रजेवर गेल्या होत्या. राजदीप आणि सागरिका या दोघांनीही आपला राजीनाम दिला आहे. याच दरम्यान आयबीएन लोकमतचे नितीन वागळे यांनीही राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या आहेत. वागळे गेल्या चार दिवसांपासून आजचा सवाल आणि प्राईम टाईम बुलेटीनमध्ये दिसत नाहीत यामुळे अफवांना पेव फुटले आहे. काही दिवसांपुर्वी वागळे यांनी ट्युटरवर "मुंबईच्या जीवनाचा कंटाळा आला आहे" असे ट्युट केले होते यामुळे वागळेंनी आयबीएन - लोकमत सोडले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.