Monday 20 January 2014

ज्येष्ठ पत्रकार अशोक आचार्य यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार अशोक आचार्य यांचे कांदिवली येथील निवासस्थानी शनिवारी रात्री झोपेतच निधन झाले. ते ८0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात, दोन पुत्र, सून, नातवंडे असा परिवार आहे. औरंगाबाद येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी माध्यम क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर 'सकाळ' या दैनिकातून त्यांनी पत्रकारितेस प्रारंभ केला. १९६५ मध्ये 'महाराष्ट्र टाइम्स' सुरू झाल्यावर ते टाइम्स समूहात दाखल झाले. तब्बल ३३ वर्षांच्या तेथील पत्रकारिते मध्ये त्यांनी विधायक, सामाजिक व राजकीय वृत्तांकनावर विशेष भर दिला. १९९३ मध्ये 'मटा'च्या विशेष प्रतिनिधीपदावरून ते सेवानिवृत्त झाले. दै. 'लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांचे ते वडील होत.