लग्नाच्या भूलथापा देऊन महिला पत्रकारावर बलात्कार केल्याप्रकरणी गोराई पोलिस ठाण्यात कपिल इंगोले (30) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तो जनसंपर्क क्षेत्रातील कंपनीत कामाला आहे. विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या कपिलचे एका पत्रकार तरुणीशी प्रेमसंबंध होते. लग्नाच्या भूलथापा देत त्याने तिला गोराई येथे नेऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर काही दिवसांनी पीडित तरुणीला वर्णावरून हिणवत तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिला. त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. हा गुन्हा दाखल झाल्यापासून कपिल फरारी झाला आहे.
Saturday, 7 June 2014
Friday, 6 June 2014
पालिका वार्ताहर संघाच्या सेटिंगवाल्या निवडणुकीची घोषणा
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील महानगरपालिकेमधील पत्रकार व त्यांच्या वार्ताहर संघटनेचे बेरक्याने वाभाडे काढल्यावर वार्ताहर संघाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. निवडणूक घेताना पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला निवडणूक अधिकारी नेमल्याने यावेळीही जनसंपर्क अधिकारी ठरवणार तेच पत्रकार पदाधिकारी होणार असल्याने अश्या सेटिंगवाल्या निवडणुका घेण्याची गरजच काय असा प्रश्न वार्ताहर संघाच्या काही सभासदांनी विचारला आहे.
Wednesday, 4 June 2014
पत्रकारांवरील हल्ले / प्रेस कौन्सिल करतेय नवे नियम - न्या.मार्कन्डेय काटजू
पत्रकारांवरील वाढते हल्ले,पत्रकारांच्या वाढत असलेल्या हत्त्यांची दखल अखेर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानं घेतली असून या संदर्भात कौन्सिल पत्रकारांच्या हितासाठी काही नवीन नियम तयार करीत असल्याची माहिती प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या.मार्कन्डेय काटजू यांनाी काल पणजी येथे दिली.
राजदीप सरदेसाई गेले सुट्टीवर
आयबीएन न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक आणि प्रसिध्द पत्रकार राजदीप सरदेसाई हे आजपासून प्रदीर्घ रजेवर गेलेत.मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने नेटवर्क 18 समुहाची खरेदी चार हजार कोटींना केलीय.या पार्श्वभूमीवर राजदीप रजेवर गेल्याचं समजतंय.राजदीप यांंच्या पत्नी आणि उप मुख्यसंपादक सागरिका घोष या देखील रजेवर गेल्याचं सांगण्यात येतं.सूत्रांच्या माहिती नुसार राजदीप आणि सागरिका पुन्हा कामावर येण्याची शक्यता फारच कमी आहे.
ओरिसात पत्रकाराची हत्त्या
ओरिसातील टीव्हीचे पत्रकार तरूण आचार्य यांच्या हत्त्येची चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा करावी आणि आचार्य यांच्या नातेवाईकांना 50 लाख रूपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी पत्रकारांनी आज (२ जून २०१४) भुवनेश्वर येथे निदर्शने केली. ओरिसा जर्नालिस्ट असोसिएशनने या हत्याकांडाची सीबीआयतर्फे चौकशी करण्याची मागणी केली आहे.भुवनेश्वर जिल्हा पत्रकार संघानेही घटनेचा निषेध करीत आ़चाय यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यौची मागणी केलीय.गंजाम जिल्हयातील खलीकोट येथे एका वाहिनीसाठी काम करणाऱे आचार्य यांची मागच्या मंगळवारी अत्यंत निर्दयपणे हत्त्या केली गेली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
