Friday, 11 July 2014

मिडियाकडून सरकारची चाटूगिरी

लोकसभेमध्ये महागाईवर चर्चा सुरु असताना काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना झोप आली म्हणून इलेक्ट्रोनिक मिडीयावर दिवसभर तसेच दुसऱ्या दिवशी प्रिंट मिडिया मध्ये तसे फोटो आणि बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याच्याच दुसऱ्या दिवशी बजेट सादर झाले त्या दिवशी स्मृती इराणी व इतर मंत्रीही झोपा काढत होते. परंतू राहुल गांधींची बातमी प्रसारित करणाऱ्या मिडियाने सत्ताधारी झोपले असताना तश्या बातम्याच प्रसारित केलेल्या दिसत नाही. यामुळे मिडिया मोदींच्या सरकारची चाटूगिरी करत असल्याची चर्चा सध्या सोशल मिडीयावर वर होत आहे.

Tuesday, 8 July 2014

दहशत पसरवत खंडणी गोळा करणारा संपादक

Displaying rajaram.jpg
"खबरे आज भी" नामक साप्ताहिकाचा संपादक  राजाराम जैसवाल हा खंडणी वसुलीची कामे करत असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. अश्या खंडणीखोर पत्रकारांमुळे पत्रकारितेचे नाव बदनाम होत आहे. 

Monday, 7 July 2014

भुरट्या पत्रकार आणि संघटनामुळे पत्रकार संरक्षण कायदा नाही !

महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर वारंवार हल्ले होत असल्याने पत्रकार हल्ला विरोधी कायदा बनवावा अशी मागणी केली जात असताना सरकारने मात्र हा कायदा बनवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. बेरक्याने याबाबत माहिती घेतली असता पत्रकार कोणाला म्हणावे आणि पत्रकारांच्या अधिकृत नोंदणीकृत संघटना कोणत्या याच स्पष्ट नसल्याने पत्रकार हल्ला विरोधी कायदा बनवला जात नसल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे. 

Saturday, 5 July 2014

वागळे यांनी आयबीएन लोकमत सोडल्याची चर्चा

आयबीएन न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक आणि प्रसिध्द पत्रकार राजदीप सरदेसाई व त्यांच्या पत्नी सागरिका घोष यांनी राजीनामा दिल्यानंतर आयबीएन लोकमतचे निखिल वागळे यांनी सुद्धा राजीनामा दिल्याच्या अफवांना पेव फुटले आहे.  

बारामतीतल्या करामती पत्रकाराचा खेळ लवकरच संपणार!

पुण्याहून सकाळीच निघणाऱ्या एका दैनिकाच्या बारामतीतील बातमीदाराचे अनेक कारनामे व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने त्याचा डाव लवकरच संपणार असल्याची खात्रीलायक माहिती बेरक्याला मिळाली आहे.