पत्रकाराचे अपघाती निधन झाले असेल,किंवा एखादा पत्रकार जखमी झाला असेल तर त्याला किंवा त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी दिल्ली राज्य सरकारने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी पत्रकार कल्याण निधी सुरू केला आहे.अशी योजना सुरू करावी ही दिल्लीतील पत्रकारांची मागणी पूर्ण झाल्याने दिल्लीकर पत्रकार आनंदीत आहेत.
एखादया पत्रकाराचा अपघाती किंवा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या कु टुंबियांना तीन लाख रूपयांची मदत देण्याची तरतूद सरकारने केली आहे.कायम स्वरूपी अपंगत्व आलेल्या पत्रकाराला दोन लाख रूपये तर आजारी पत्रकारांसाठी औषधोपचारासाठी एक लाख रूपये देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सरकारचाही पत्रकार कल्याण निधी आहे.पण केवळ आजारासाठी दहा-पाच हजार हातावर ठेऊन पत्रकाराची बोळवण केली जाते.औरंगाबादेत गेल्या चार महिन्यात दोन ज्येष्ठ पत्रकारांचे अपघाती निधन झाले त्यांच्या नातेवाईकांना या निधीतून कसलीही मदत दिली गेलेली नाही.