मुंबई, दि. २४ :- राज्यातील पत्
रकारांवरील वाढते हल्ले तसेच त्
यांच्या हत्या रोखण्यसाठी विधान
परिषदेतील विरोधी पक्षनेते धनं
जय मुंडे यांनी परिषद सभागृहा
त मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला
मोठे यश मिळाले असून पत्रकार सं
रक्षण आणि हल्लाविरोधी कायद्याचे
प्रारुप एक महिन्यात तयार करण्
यात येईल, असे आश्वासन गृहराज्
यमंत्री राम शिंदे यांनी आज सभा
गृहात दिले. यामुळे पत्रकार सं
रक्षणविषयक कायदा निर्मितीची प्
रक्रिया एका निर्णायक टप्प्यावर
पोहचली आहे.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या
ंनी सभागृहात लक्षवेधीद्वारे हा
मुद्दा उपस्थित करताना सांगितले
की, राज्यात गेल्या तीन वर्षा
त २६५ पत्रकारांवर हल्ले झाले
असून त्यातकाही पत्रकारांना प्
राणही गमवावे लागले आहेत. मीरा
रोड परिसरात राघवेंद्र दुबे या
पत्रकाराची झालेली हत्या तसेच
वार्तांकनासाठी गेलेल्या महिला
पत्रकाराचा मुंबईत झालेला विनयभं
ग या गंभीर घटना आहेत. अशा घटना
ंमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे
आणि असुरक्षितेचे वातावरण असून
पत्रकारांच्या सर्वच संघटना या
कायद्याची मागणी करीत रस्त्या
वर उतरल्या आहेत. पत्रकार संघटना
ंनी लोकप्रतिनिधींना हजारो
एसएमएस पाठवून केलेल्या आंदोलना
चाही त्यांनी उल्लेख केला. राज्
यातील पत्रकारांमधील असुरक्षिते
तेची दखल घेऊन पत्रकार संरक्षण
कायदा राज्यात तातडीने लागू
करण्याची मागणी धनंजय मुंडे यां
नी केली. आपण कायदा करणार की सं
रक्षण परिषद स्थापन करणार याबा
बतचा खुलासा करण्याची मागणीही त्
यांनी केली.
या लक्षवेधीला उत्तर देतांना गृ
हराज्यमंत्री राम शिंदे यांनी
मुख्यमंत्री, विधीमंडळाचे नेते,
विरोधी पक्षनते तसेच सर्वपक्षी
य नेत्यांशी चर्चा करुन एका महि
न्यात पत्रकार संरक्षणकायद्याचे
प्रारुप तयार करण्यात येईल,
असे आश्वासन दिले. त्यावर चर्चा
करताना मुंडे यांनी, का
यद्याचे प्रारुप निश्चित झाल्या
वर त्यासंबंधीचा अध्यादेश ता
तडीने जारी करण्यातयावा तसेच
आगामी हिवाळी अधिवेशनात अध्यादे
शाचे कायद्यात रुपांतर करावे,
अशी मागणीकेली. विधान परिषद
सदस्य माणिकराव ठाकरे,
किरण पावसकर, विद्या चव्हाण,
डॉ.नीलम गोऱ्हे, हेमंत टकले, सं
जय दत्त आदी सदस्यांनी या चर्चे
त सहभाग घेतला.