Thursday 2 January 2014

रमेश सावंत नावाच्या भुरट्या पत्रकारावर कारवाही होणार

पोलिसात तक्रार दाखल 
2/12/2014
मुंबई महानगर पालिकेमध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्सचा प्रतिनिधी असल्याचे सांगून गेले कित्तेक वर्षे रमेश सावंत नावाचा भुरटा पत्रकार पालिकेमध्ये वावरत होता. मुंबई मधील मोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांबरोबर नेहमी वावरणाऱ्या या सावंत नावाच्या पत्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल विभागात राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नावाने पुरस्कार देण्याच्या नावाने पैसे वसुली सुरु केली होती. यासाठी मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, महापौर सुनील प्रभू इत्यादी मोठमोठ्या राजकारणी लोकांच्या नावाचा वापर सावंत याने केला होता. 

रमेश सावंत याला दैनिक रत्नागिरी टाइम्स मधून ५ वर्षापूर्वी काढून टाकले असताना पालिकेमधील जनसंपर्क अधिकारी याचा आशीर्वाद असल्याने गेले ५ वर्षे हा सावंत नावाचा भुरटा पत्रकार पालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये बिनधास्त वावरत होता. राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकारांना रमेश सावंत यांच्या बाबत कहरी माहिती मिळताच त्यांनी याबाबत स्थानिक राजापूर पोलिस ठाण्यामध्ये लेखी तक्रार केली आहे. पोलिसांनी सावंत याला चौकशीसाठी बोलावले असता रमेश सावंतने राजापूर तालुक्यातून पळ काढून मुंबई गाठली आहे. दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार ५ जानेवारीला रमेश सावंत याला पोलिसांनी चौकशी साठी बोलावले आहे. दैनिक रत्नागिरी टाइम्सचा प्रतिनिधी असल्याचे सांगणाऱ्या सावंत याला पोलिसांना खरी माहिती उपलब्ध झाल्याचे समजताच त्याने आता मी दैनिक पुढारी, पुण्या नगरीचा पत्रकार असल्याचे खोटे सांगण्यास सुरुवात केली आहे. 

रमेश सावंत यांच्या सारख्या भुरट्या पत्रकारांमुळे इतर पत्रकारांचे नाव बदनाम होत असल्याने राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी आणि सभासदांनी जी भूमिका घेतली आहे त्याचे कौतुक करावेच लागेल.राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघा प्रमाणेच मुंबई महानगर पालिकेमध्ये हा भुरटा पत्रकार वावरत असल्याने मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघ आणि पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सुद्धा या भुरट्या पत्रकारावर कारवाही करण्याची गरज आहे.