आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीसाठी मुंबई मधून वृत्तसंकलन करणारे सुधाकर कश्यप यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कश्यप हे मुंबईच्या वरळी विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढवणार असल्याच्या बातमीची सध्या "व्हाट्सअप"वर चर्चा आहे. सुधाकर कश्यप यांना तळागाळातील समस्यांची माहिती आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून कश्यप यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले असून कित्तेक प्रकरणांना वाचा फोडली आहे. यामुळे सध्या मंत्री असलेले सचिन अहिर यांना वरळी विधानसभा मतदार संघामधून चांगलेच आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे कश्यप यांना धमकी मिळाल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे.….
सुधाकर कश्यप यांना बेरक्याच्या शुभेच्छा !!!