Tuesday 14 January 2014

आप प्रमाणेच मनसेही आता उमेदवारी देताना माध्यमकर्मींचा विचार कऱणार

पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना चांगले दिवस येऊ घातले आहेत असे दिसते.दिल्लीत केजरीवाल यानी दोन पत्रकारांना मंत्री केल्याने आणि आणखी काही पत्रकारांना आपचे सदस्य व्हायला निमंत्रित केल्याने देशातील पत्रकारांना राजकारणाबद्दल आकर्षण वाटायला लागले आहे.पत्रकारंाचा ओघ आप कडे लागला आहे.

माध्यमकर्मीना आपल्याकडे आकर्षित करण्यात केजरीवाल यशस्वी होत असल्याचे पाहून मनसे प्रमुख राज साहेब यांनीही आता माध्यमांबददल ममत्व दाखवायला सुरूवात केली आहे असे संकेत आहेत.राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वच्छ चेहऱ्यांच्या व्यक्तींंना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.यात शिक्षण,आरोग्य क्षेत्राबरोबरच माध्यमातील व्यक्तीचाही समावेश असणार आहे.राज ठाकरे यांनी सरप्राईज उमेदवार देण्याचं नक्की केल्याने काही पत्रकारांना मनसेच्या उमेदवारीची लॉटरी लागू शकते.स्वागतार्ह गोष्ट आहे.

यापुर्वी केवळ शिवसेनेने पत्रकारांना राजकीय क्षेत्रात काम कऱण्याची संधी दिली होती.नारायण आठवले,संजय निरूपण,भरतकुमार राऊत,संजय राऊत यांना शिवसेनेनेच राज्यसभेवर पाठविले होते.कॉग्रेस किंवा राष्ट्रवादीने मात्र पत्रकारांना केवळ चॉकलेटच दिले.अनेक पत्रकारांकडून सोनिया स्तुतीची कवणे गाऊन घेतल्यानंतरही त्यांना राज्यसभा किंवा विधानपरिषदेचा दरवाजाही दाखविला गेला नाही.असे अनेक ज्येष्ठ संपादक आजही मनोभावे सोनिया स्तुती गाताना दिसतात. परंतू स्वच्छ प्रतिमेचे चेहरे अन्य पक्ष देत असतील तर कॉग्रेसलाही याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 


http://batmeedar.com मधून साभार